मराठवाड्यातील बहुतांश लहान, मध्यम व मोठे प्रकल्प तळाला गेले आहेत. मे/वैशाख महिन्यांत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. विभागातील सर्व प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. ...
घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव बंधाऱ्यात असलेले ६१ टक्के पाणी सोडण्यास शिवनगावकरांनी विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास शिवणगाव बंधा-यातील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले. ...
मालेगाव : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार योजनेची तालुक्यातील १२५ गावांमध्ये कामे सुरू आहेत. २३ लाख रुपयांच्या इंधन खर्चातून १०८ लाख रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. एक लाख ७४ हजार २३४ घनमीटर गाळ आतापर्यंत काढण्यात आला असून, १७ कोटी ४२ ल ...
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी ...
शहराची वाढती लोकसंख्या आणि ग्रामीण भागात पाणी वहनाची जुनी पद्धती यामुळे पुण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा उन्हाळ्याच्या मध्यावर जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर भीषण परिस्थिती उद्भवू शकते. ...
वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित र ...
वाशिम : जिल्ह्यात ३ मध्यम व १२३ लघू असे एकंदरित १२६ प्रकल्प आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक प्रकल्प यंदा कोरडे पडले असून दोन मध्यम व १७ लघुप्रकल्पांमधील गाळाचा उपसा करण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेतला आहे. ...