देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...
भाजपने ज्या पोलिसांकडील कागदपत्रांवरून आरोप केले आहेत, ते भाजपच्या प्रवक्त्याकडे कसे आले? ही अघोषित आणिबाणी आहे. पक्ष, सरकार आणि तपास यंत्रणा असा वेगळेपणा राहिलाच नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष यांनी मिळून पर्रीकर यांची खुर्ची राखली हे आता स्पष्ट होत आहे. ...
सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी व सर्वसामान्यांची सेवा करण्यास संधी द्यावी असे साकडे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतील प्रमुख नेत्यांनी घातले. ...