देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यात सरकारमध्ये नेतृत्व बदल होऊ शकतात, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपामध्ये फेरप्रवेश करू शकतात, भाजपाचे तीन आमदार फुटतील अशा प्रकारच्या अफवांमुळे गोवा राज्य गेले तीन दिवस ढवळून निघाले आहे. ...
भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांच्या संदर्भात जे अनुद्गार काढले, त्याचा सर्वत्र निषेध होत असून, औरंगाबादेतही त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ...
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. ...
सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते मुलींना पळवून नेण्याची भाषा करित आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या मस्तवाल नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही ...
भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलांना कदम यांच्या फोटोला चपला मार आंदोलन केले. तसेच त्यांनी महाराराष्ट्रतील तमाम महिलांची माफी मागावी अशी मागणी सुध्दा केली. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांच्या संतापाची झळ चंद्रकांत पाटील यांनाही बसली. मी काही आकाशातून आलेला नेता नाही. ...