देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. ...
पाच वर्षात भाजपने सर्व सत्ता केंद्र काबीज केली आहेत.सध्या पंतप्रधानपदाची जागाच रिकामी नसल्यामुळे विरोधक एकत्र येऊन काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी केला आहे. ...