देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने सरकार स्थापन केल्यास, या तिन्ही पक्षांना सर्वात आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पक्षांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडत आहे. तर दिल्लीतही सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होत आहे. ...
आता विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार आहेत. त्यामुळे 'जालना पॅटर्न' राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राबविण्यात येणार हे निश्चित आहे. आहे. या पॅटर्नची चर्चा जालना जिल्ह्यासह राज्यभर गाजणार आहे. ...