देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी व काँग्रेसची महाशिवआघाडी सत्तेत येण्याची चिन्हे असतानाच जिल्हा परिषदेतही महाशिवआघाडीचा प्रयोग होऊ शकतो, अशीच चर्चा राजकीय वर्तूळातून सुरु झाली आहे. तसेच १९ नोव्हेंबर रोजी जि.प. अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईत होणार असल्या ...