देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Param Bir Singh Letter: गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना मोदी शहांवरदेखील आरोप झाले, त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का?; सावंत यांचा सवाल ...
परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप झाला असून तीन पक्षीय ठाकरे सरकारला हादरा बसला आहे. याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. ...
Balasaheb Thorat And Nana Patole : राज्याच्या बाबतीत नेतृत्व पटोले यांच्याकडे असले तरीही अनेक निर्णय एकत्र बसून विचारांनी होतात असेही थोरात म्हणाले. ...
West bengal Assembly Election 2021 : भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते आपल्या प्रचारसभेत 'जय श्रीराम' ही घोषणा देत आहेत. ...
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांचे अधिकार बाधित झाल्याचे विधान केल्याचा ठपका ठेवला. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर चव्हाण यांनी ट्वीटरवरून हे आरोप खोडून काढले. ...
Congress Rahul Gandhi And RSS : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आसामच्या दौऱ्यावर आहेत. ते विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत असून दिब्रुगढमध्ये झालेल्या प्रचारसभेत त्यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारसोबतच आरएसएसवर देखील निशाणा साधला. ...