देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार, यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत याच मुद्द्यावर गरमागरम चर्चा झाली होती. ...
Navi Mumbai airport News: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. ...
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली. ...
बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकासमोर, एस व्ही रोड येथे मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. ...