देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांवर टीका केली. "मित्रांनो, या अधिवेशनात संसद देशासाठी काय विचार करत आहे, काय करू इच्छिते आणि काय करणार आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधकांनीही त्यांची जबाबदारी पार पाडली पाह ...
राज्यातील काही नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रांतील निवडणुका अचानक काही वार्डमध्ये न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय पूर्णतः मनमानी असून निर्वाचन आयोग आणि सरकार यांची मिळून बनवलेली चुकीची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे ठाकुर यांन ...
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत एसआयआरचा मुद्दा गाजला, विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले. ...