देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार की स्वबळावर लढणार याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांकडून बोलणी सुरू असून वंचित काँग्रेससमोर जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे. ...
Supriya Sule News: राज्यात महापालिका निवडणूक होत असून, या निवडणुकींमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का? याबद्दल अजूनही साशंकत आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं विधान केलं आहे. ...
नगरपरिषदांसाठी वंचितने काँग्रेसपुढे समसमान जागांचा प्रस्ताव ठेवला होता. जागावाटपाचे हेच ५०-५० सूत्र वंचित मुंबई महापालिकेसाठीही कायम ठेवू शकतो, असे म्हटले जाते. ...
Goa Local Body Election Result: आज लागलेल्या गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. तर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. ...
Harshwardhan Sapkal News: काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर या निवडणुकांत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक राज्यातील मतदारांनी निवडून दिले. या निकालावरून पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो आणि सत्तेपेक्षा विचार महत्त्वाचा असतो ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उत्तर भारतीयांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला असून रविवारी या ... ...