करुया आता कल्ला! दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 05:41 PM2018-03-22T17:41:40+5:302018-03-22T17:41:40+5:30

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाची समजली जाणारी दहावीची परीक्षा गुरुवारी संपली. नवी मुंबईतही शेवटच्या पेपर देऊन झाल्यानंतर तणावमुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

पेपर संपल्यानंतर लगबगीने वर्गातून बाहेर पडलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी.

शेवटचा पेपर देऊन झाल्यानंतर विद्यार्थिनींमध्ये गप्पाटप्पाही रंगल्या.

शेवटच्या पेपरची आणि दहावीच्या परीक्षेची आठवण म्हणून सेल्फीही काढले गेले.

फिर मिलेंगे! म्हणत एकमेकींची गळाभेट घेताना दोन विद्यार्थिनी.