नाणार जाणार नाही, तर इथे होऊ घातलेला प्रकल्प जाणार. कोणत्याही परिस्थितीत हा विनाशकारी प्रकल्प कोकणात होऊ दिला जाणार नाही, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रत्नागिरीमधील नाणार येथे केली. ...
- रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे. ...
नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हे केंद्र सरकारचे पाप आहे. या पापात दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. केवळ भारतीय कंपन्यांचाच हा प्रकल्प असेल, १०० टक्के सहभाग केंद्र सरकारचा असेल असे सांगितले होते. ...
चिपळूण येथे इंडिका कार आरामबसवर आदळून झालेल्या अपघातात रत्नागिरी जाकादेवी येथील एक जण ठार झाला, तर दोन महिला एक पुरुष व एक दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झालीय. ...
फिरण्यासाठी मे महिन्यात बाहेर पडणार असाल तर आता तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागू शकतो. कारण कोकण मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या सध्या हाऊसफुल्ल आहेत. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांचा अपवाद सोडला तर मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या सर् ...
चिपळूण तालुका हा विचारवंतांचा तालुका आहे. याठिकाणी लवकरच रेल्वेचा कारखाना होणार आहे. २५ वर्षात कोकण रेल्वेत जी कामे झाली नव्हती, ती कामे गेल्या काही महिन्यात आपण मार्गी लावली आहेत. कोकणच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया, असे आव ...
सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, खेर्डी - चिंचघरी सती येथे मोफत बालसंस्कार शिबिर पार पडले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी घोडेस्वारीचा आनंद लुटला. ...
यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची ...