परभणी-मानवतरोड रेल्वे मार्गावर कोल्हावाडी गाव असून या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागाने भुयारी पूल उभारला आहे; परंतु, पहिल्याच पावसाने या पुलात पाणी साचल्याने गावाला जाणारा रस्ता बंद पडला आहे. ...
जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली असून, जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार १६६ विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची १४ लाख १९ हजार ८०७ पाठ्यपुस्तके बालभारतीकडून जिल्ह्याला प्राप्त झाली आहेत़ शाळेच्य ...
जिल्ह्यातील आरोग्य विभागाने २०१७ पासून परवाना नसणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कारवाई सुरु केली असून त्यात मागील तीन वर्षांमध्ये ९४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर्षीही ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र २० दिवसांतून एकवेळा पाणी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
शनिवारपासून प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्यापही हटली नसून ग्रामीण भागातील ९४ टंचाईग्रस्त गावांना ९४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या संख्येवरुनच यावर्षीच्या पाणीटंचाई गांभीर्य समोर येत आहे. ...
सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी के ...
पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ४०७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे़ त्यापैकी ८३ विहिरींचे पाणी टँकरसाठी तर ३२४ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे़ ...
पेडगाव येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचा होत असलेला त्रास दूर करण्यासाठी आधी पर्यायी रस्ता आणि त्यानंतर पुलाचे काम करण्याचा तोडगा ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काढण्यात आला़ ...