Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
राज्यपालांनी राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून उद्याच बहुमत चाचणी घेण्याचं पत्र पाठवलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. ...
Maharashtra Political Crisis Eknath Khadse : मुंबईत बैठका आटोपून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे जळगावमध्ये दाखल झाले आहेत. मात्र खडसेंनी राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात बोलण्यास नकार दिला. ...