देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे भक्कम पाठबळ असल्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही मात्र यामुळे विरोधकांनी सभागृहाबाहेर केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याची संधी भाजपाकडे चालून आली आहे. ...
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील लोकपाल निवड समितीच्या शुक्रवारी २० जुलै रोजी होणा-या बैठकीचे निमंत्रण लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाकारले. ...