देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यातील दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार,ढासळतलेली कायदा व सुव्यवस्था, आरक्षणाचे रखडलेले प्रश्न यासह अनेक प्रश्नावरून सरकारला कसे कोंडीत पकडण्यात येईल,यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. ...
एमपी मिल कंम्पाऊंड प्रकरणाचा अहवाल दाबून ठेवला गेला, सिडकोचा भूखंड घोटाळा आम्ही समोर आणला, त्यावर कारवाई झाली नाही, असे गंभीर आक्षेप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदवले. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून जिल्हा कॉँग्रेसची बैठक शुक्रवारी होऊन त्यात तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले. राष्टÑवादीशी सन्मानजन्य आघाडी करण्याबरोबरच गत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या वर्तणुकीबद्दल खेद व्य ...
काही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी विरोधात प्रचार केल्याच्या तक्रारी आढावा बैठकीत उमेदवार यांनी केल्या असून, त्याबाबत जेव्हा राष्ट्रवादीसोबत राष्ट्रीय चर्चा होईल त्यावेळी ह्या विषयाबद्दल चर्चा केली जाईल, असेही अशोक चव्हाण म्हणाले. ...