देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कमलनाथ सरकार पाडण्यामागे नेमकी कुणी भूमिका बजावली आणि ते नेमके कुणाच्या आदेशावरून पाडले गेले याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप तेव्हापासून सुरू आहेत. आता याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारी एक ऑडियो क्लीन व्हायरल झाली आहे. ...
भारत शांततापूर्ण मार्गाने वादावर तोडगा काढेल, पण आज कोणीही भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नाही असं विधान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. ...
पालकमंत्री अजित पवार यांनी रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्याच्या संदर्भात बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करू नये; अन्यथा राज्य सरकारला आपले अधिकार वापरावे लागतील, असे स्पष्ट केले होते... ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनावरून सरकारला लक्ष्य केल्यानंतर लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करून चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ...