देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यात कोरोनाचे संकट असताना माणुसकीची जराही चाड न ठेवता भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आमदारांचा घोडाबाजार भरवून आपले सरकार पाडण्याच्या खटपटी करत आहे, असा उघड आरोप गेहलोत यांनी केला आहे. ...
Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. याचदरम्यान पायलट भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ...
Rajasthan Political Crisis : काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. ...