राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 05:38 IST2026-05-03T05:37:23+5:302026-05-03T05:38:06+5:30
मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून, मुलांची ८६.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुली या मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे राज्यात दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल शनिवारी दुपारी १२ वाजता ऑनलाइन जाहीर केला. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात २.०९ टक्के घट झाली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ टक्के असून, मुलांची ८६.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच, मुली या मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे राज्यात दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के इतका लागला असून सर्वात कमी राहिला आहे.
शाखानिहाय निकाल
विज्ञान
८६.४४%
कला
७८.०२%
वाणिज्य
८७.०३%
व्यवसाय अभ्यासक्रम
८२.७४%
आयटीआय
८३.७८%
२६ विषयांचा निकाल १००%
राज्य मंडळाने एकूण १५३ विषयांसाठी परीक्षा घेतली. यापैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बहुतांश शाखांमध्ये थोडी घसरण झाली असून, कला शाखेचा निकाल तुलनेने कमी राहिला आहे.
यंदाचा निकाल
- ८९.७९%
गतवर्षीचा निकाल
- ९१.८८%
घट
२.०९%
विभागनिहाय निकाल
कोकण
९४.१४%
पुणे
९१.२५%
अमरावती
२०.९२%
नाशिक
९०.७२%
मुंबई
९०,०८%
कोल्हापूर
८९.९७%
छत्रपती संभाजीनगर
८८.६८%
नागपूर
८८.६७%
लातूर
८४.१४%
उत्तरपत्रिका तपासणीसाठी ३ मे ते १७ मेपर्यंत मुदत बारावीच्या निकालानंतर गुण पडताळणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ३ ते १७ मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती राज्य परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. निकालानंतर नवी मुंबईतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा असा जल्लोष केला.