जिल्ह्यातील पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. महाड, रोह्यातील पूरस्थिती ओसरली असली तरी नद्यांची पातळी वाढलेलीच आहे, तर नागोठणे शहरात दुपारनंतर पाणी वाढू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली. ...
मुसळधार पावसामुळे माथेरान घाटरस्त्यामध्ये रविवारी दरड कोसळली होती. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती. या घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे नव्याने होत असलेले काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत केले जात आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन परिसरामध्ये गेले तीन दिवस पाऊस तुफान बरसत आहे. परिसरातील कोंढेपंचतन व कुडकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे, तर कार्लेपंचतन धरण ५० टक्के भरले आहे. ...
कोटींचा नफा कमावून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावणाऱ्या जेएनपीटीने आता हजारो कोटींच्या निधीने, तोट्यात आणि आर्थिक डबघाईला आलेले अनेक प्रकल्प चालविण्यासाठी अथवा विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. ...
मुंबई-दिघी महामार्गावरील घोणसे घाट पावसाळ्यात प्रवासीवाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. घोणसे घाटाच्या दरड संरक्षक भिंतीचे दगड अतिवृष्टीमुळे निखळण्यास सुरु वात झाली आहे. बांधकाम खात्याने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. ...
सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. या वेळी ग्रामविकास आघाडीचे सर्वेसर्वा युवा नेते संदेश शेवाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध करण्यात आली. ...