धक्कादायक! प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रियकर बनला किडनॅपर, बर्गर स्टॉलवरून मुलाला उचललं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 01:24 PM2021-02-27T13:24:55+5:302021-02-27T13:30:51+5:30

पोलिसांना तपासादरम्यान माहिती मिळाली की, हाजीपूरच्या युसुफपूरमध्ये भाड्याच्या घरात एक प्रेमी युगुल दररोज भांडणं करतात आणि धिंगाणा घालतात. भांडणादरम्यान दोघांमध्ये एका मुलाबाबतही वाद होतो.

बिहारच्या हाजीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे जवळपास ४ महिन्यांआधी २० ऑक्टोबरला जढुआ येथून ३ वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं. मुलाचे वडील प्रमोद शर्मा बर्गरची गाडी लावतात. खूप शोध घेऊनही मुलगा मिळाला नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. तेच पोलिसांना तपास करताना अशी माहिती समोर आली की, पोलिसांसोबतच मुलाचे वडिलही हैराण झाले.

पोलिसांना तपासादरम्यान माहिती मिळाली की, हाजीपूरच्या युसुफपूरमध्ये भाड्याच्या घरात एक प्रेमी युगुल दररोज भांडणं करतात आणि धिंगाणा घालतात. भांडणादरम्यान दोघांमध्ये एका मुलाबाबतही वाद होतो.

शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना संशय येताच त्यांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी प्रेमी युगुल आणि मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन आले. पण पोलीस स्टेशनला आल्यावर जो खुलासा झाला त्यावरून ही कहाणी पूर्ण फिल्मी असल्याचं समजलं.

ताब्यात घेण्यात आलेल्या प्रेमी युगुलाने सांगितले की, त्यांनी ४ महिन्यांआधी मुलाचं अपहरण केलं होतं. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तर समजलं की, हा मुलगा प्रमोद शर्माचा आहे.

पोलिसांनी खुलासा करत सांगितले की, वैशाली जिल्ह्यातील सरायमध्ये राहणारा नितीश कुमार हा त्याच्यापेक्षा दुप्पट वयाच्या महिलेच्या प्रेमात पडला.

नितीश कुमार हा ड्रायव्हर आहे. आरोपी नितीश कुमार आपल्या प्रेयसीसोबत भाड्याच्या घरात राहत होता. नूरी म्हणजे त्याच्या प्रेयसीला मुलगा हवा होता. त्यामुळे नितीशने मुलाचं अपहरण करण्याचा प्लॅन केला.

आरोपी नितीश कुमार जवळच्या एका बर्गर स्टॉलवर रोज बर्गर खायला जात होता. तिथे त्याने बर्गर स्टॉलच्या मालकाचा मुलगा हर्षला पाहिलं.

२० ऑक्टोबरला आरोपीने मुलाचं अपहरण केलं आणि तो मुलगा प्रेयसी नूरीला दिला. नितीश कुमार आणि नूरी गेल्या ४ महिन्यांपासून या मुलासोबत राहत होते.

दरम्यान पोलिसांनी मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे सोपवलं आहे. तर आरोपी प्रेमी युगुलाला अटक केली आहे. लोक म्हणत आहे की, मुलाचं अपहरण, ४ महिन्यांनी तो पुन्हा मिळणं आणि अपहरणा मागचं कारण ही तर एखाद्या सिनेमाची कथा वाटत आहे.

एडीपीओ राघव दयाल यांनी सांगितले की, एका बर्गर विकणाऱ्या व्यक्तीच्या मुलाचं अपहरण झालं होतं. ज्याने अपहरण केलं तो त्याचा रेगुलर कस्टमर होता. तो रोज त्याच दुकानावर बर्गर खात होता.

त्याने तेथून मुलाचं अपहरण केलं आणि ते मुल त्याने प्रेयसीकडे सोपवलं. कला नगर पोलीस स्टेशनने मुलगा शोधला. मुलगा त्याच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आला.