शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाटबंधारे खात्याने महापालिकेशी तातडीने करार करावा यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आदेश देऊन शनिवारी (दि. ९) महिना पूर्ण होत आहे. परंतु तरीही पाटबंधारे खात्याने टाळाटाळ कायम ठेवली असून आठ वर्षांपासून न झालेला करार अ ...
‘दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार’ असे आश्वासन देत मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले होते. परंतु साडेचार वर्षे उलटूनही हे सरकार ना रोजगार, ना उद्योगपूरक शासकीय योजना राबवित आहे, असा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या नाशिकमधून युवा आघाडीने शालिमार परिसरात स ...
स्वातंत्र्यपूर्व काळात भारत-पाक युद्धात महत्त्वाची जबाबदारी बजावलेल्या भारतीय वायुसेनेच्या ‘डकोटा डी-सी ३’ या लढाऊ विमानाचे तब्बल सात दशकानंतर गाझियाबादहून भरारी घेत नाशिकच्या ओझर विमानतळ येथे शुक्र वारी (दि.८) दुपारी साडेतीन वाजता आगमन झाले. यावेळी ...
४५ लाख रुपये बाजारमूल्य असलेला गाळा दहा लाख रुपयांना विक्री करावा यासाठी गाळामालकास धमकावून रस्ता बंद केल्याप्रकरणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संशयित सुहास कांदे यांच्यासह आणखी एकाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाढत्या अपघातांवर नियंत्रण बसावे तसेच वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. ...
वाईट स्वप्नांमुळे चाळीस वर्षीय महिलेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास पाथर्डी गावातील मारुती मंदिरासमोर घडली़ ...
बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी जात-पात विसरून संघटित व्हावे. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहचवावेत. एकजुटीत जो आनंद असतो, तो स्वर्गातही नाही, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज गोतिसे यांनी केले. ...
अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या दोघांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवटीतील निमाणी बसस्थानकात गुरुवारी (दि़७) दुपारच्या सुमारास घडली ...
त्र्यंबक नाका ते मेहेर दरम्यानच्या एका रस्त्याच्या कामामुळे अवघ्या शहराला वेठीस धरण्यात आले आहे. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर नगरसेवक हे काम स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याचे सांगून मान ...