जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाले होते. ...
सोमवारी व मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या गोंदिया आगारातील तब्बल २३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर काही फेऱ्यांच्या प्रवास अर्धवटच झाला. त्यामुळे गोंदिया आगाराचा एक लाखाच्या वर नुकसान झाले. ...
आर्थिकदृष्टया चणचण असलेल्या येथील नगर परिषदेकडून शिक्षण विभागावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र यानंतरही त्याचे फलीत होत नसून नगर परिषदेच्या शाळांची स्थिती मात्र गंभीरच आहे. पालिकेने शिक्षण विभागासाठी सन २०१८-१९ यावर्षात चार कोटी ३४ लाख रूपयांच ...
मागील पंधरा दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला. पावसाचा जोर सोमवारी (दि.१६) दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत कायम होता. त्यामुळे जिल्ह्याती ...
शहरातील मुख्य बाजार परिसरातील उत्तम स्टोर्स या कापड दुकानाला रविवारी (दि.१५) रात्री ८ वाजतादरम्यान अचानक आग लागली. दुकानातील एअर कंडीशनर (एसी) मध्ये शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली होती. मात्र वेळीच उपाययोजना केल्याने मोठे नुकसान टळले. ...
थकीत वीज बिलापोटी पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी कापली जाते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. हा प्रकार थांबावा. यासाठी तालुक्यातील ४० पाणी पुरवठा योजनांना सौर उर्जेची जोड देण्यात येणार आहे. ...
जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, प्रतापगड व मुरदोली येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी प्रत्येक स्थळाला पाच कोटी प्रमाणे १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर के ...
विधानसभा क्षेत्रातील ग्राम बनाथर ते ग्राम सतोना मार्ग गोंदिया- बालाघाट राष्ट्रीय राज्यमार्ग तसेच ग्राम चुटिया ते ग्राम पांगडी या दोन रस्त्यांच्या रूंदीकरण व डांबरीकरणासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे ९ किमी लांबीच्या या द ...
यंदा नगर परिषदेने शहरात मॉन्सूनपूर्व सफाईची कामे केली नाही. परिणामी रविवारी (दि.१५) रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील नाला आणि नाल्या चोक होवून अनेक वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांना रात्र ज ...