गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना र्जीण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचे काम नागपूर येथील एका एजन्सीला देण्यात आले आहे. ...
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा ते देव्हाडा रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली असून पावसाळ्यात या मार्गावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र अद्यापही रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. घाटकुरोडा गावातून वैनगंगा नदीच्या काठावर रेतीघाट असून या घाटावरुन दररोज ...
जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यात जिल्हा आरोग्य व संबंधित विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे. परिणामी कुपोषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कुपोषणाच्या समस्येवर ठोस उपाय योजना करण्यात यावी, असा मुद्दा जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर ...
सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी रौनक गोपाल वैद्य (७) याचे ३ जुलै २०१९ रोजी खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
तालुक्यातील पुरगाव-सुखाटोला रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाल्याने या मार्गावरुन विद्यार्थी आणि गावकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. ...
विविध शासकीय विभागांचे कार्यालय एकाच इमारतीत आणण्यासाठी येथील जयस्तंभ चौका लगत कोट्यवधी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली. या इमारतीचे अद्यापही लोकार्पण व्हायचे आहे. मात्र त्यापूर्वीच इमारतीची पाईप लाईन चोक झाल्याने भिंती फोडण्याची वेळ आल ...
येथील नगरपंचायतचे १८ सफाई कामगार मंगळवारपासून (दि.८) उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणावर बसले आहेत. नगरपंचायत निर्मितीच्या पूर्वीपासून अनेक सफाई कामगार शहरातील घनकचरा संकलनाचे काम करीत आहेत. आजतागायत त्यांना रोजं ...
बौद्ध पौर्णिमेच्या दिनी चंद्राच्या प्रकाशात करण्यात आलेल्या यंदाच्या निसर्गानुभव मचान निरीक्षणात येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात रानगव्यांची संख्या अधिक आढळली. त्यामुळे या क्षेत्रावर रानगव्यांची सत्ता असल्याचे आढळले. ...
प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे शासन अनेक योजना अंमलात आणत आहे. ग्रामीण भागातील जनताही शुद्ध पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंमलात आणले. ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्र शासन निधी देऊन उभारण्यात येणा ...
सौर ऊर्जा ही कधीही न संपणारी ऊर्जा आहे. हीच बाब हेरुन आमगाव येथील तुलसी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रज्वल चंद्रशेखर टेंभूर्णे या विद्यार्थ्याने सौर ऊर्जेवर धावणारी सायकल तयारी केली आहे. ...