जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पक्षीस्थळावर गेल्या दोन महिन्यांपासून पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. बोरी येथील संजयनगरातील विठ्ठलराव अंभुरे या पक्षीप्रेमीकडून मागील १५ वर्षापासून या पक्षांना अन्न व पाणी पुरविण्याचे काम केले जात आहे. ...
उसतोड मजुरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्डीत वृक्षलागवड ही लोक चळवळ बनली आहे. श्रमदानातून येथील ग्रामस्थांनी १० हजार वृक्षाची लागवड करण्यासाठी खड्डे खोदले आहेत. आतापर्यंत ८ हजार वृक्षांची लागवडही करण्यात आली आहे. ...
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे़ पाण्याअभावी माना टाकणारी पिके भीज पावसाने तरारली आहेत़ ...
तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या जिंतूर- परभणी रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने त्याचा फटका आता वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. राष्टÑीय महामार्गा म्हणून मान्यता मिळालेला हा रस्ता अक्षरश: चिखलाने माखला असून, जड वाहने देखील या रस्त्यावरुन घसरत ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ७७३ खातेदार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २ लाख ६६ हजार २२६ शेतकºयांचे अर्ज अपलोड झाल्याने या शेतकºयांना आता या योजनेअंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. ...
समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
येथील पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील २६ गावांमध्ये २ हजार ५९० लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ हजार रुपये या प्रमाणे १ कोटी २९ लाख रुपये ठेकेदारामार्फत देऊनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच असल्याची बाब समोर आली आहे ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ६८ इच्छुकांनी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या सदस्यांसमोर मुलाखती दिल्या. ...