राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, मंत्रिमंडळात न घेतल्याने समर्थक संतप्त झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले आहे. या आवाहनाला ते प्रतिसाद देतील का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...
मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्याने छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली. ...