नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
बिटीची लागवड करायची की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शुद्ध बियाणे मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच कीटकनाशक फवारणीचे प्रमाण कमी होईल, असे मत माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. ...
आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठ्यांच्या आरक्षण देण्याबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची समिती नेमण्यात आली होती. मात्र, ही समिती एक फार्स होती, अशी टीका करीत पटोले यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला. ...
आघाडी सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधी पक्षात असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेत येताच मराठ्यांना आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. याच मुद्यावर त्यांनी मराठ्यांची मते घेतली व मुख्यमंत ...
मत घेण्यासाठी भाजप जनतेला केवळ आश्वासने देत आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपाने प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक ...
शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आलेले हे सरकार शिवरायांच्या धोरणाविरोधात काम करीत आहे. शिवरायांनी श्रीमंतांना लुटून गरिबांना दान केले. मात्र हे सरकार गरिबांना लुटून निरव मोदीला वाटत आहे. यावरून सरकारची नियत साफ नसल्याचेच स्पष्ट होते. ...
राज्यात मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन्स) असताना भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुजरातहून ती का मागविण्यात आली, याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. ...
अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ...