'समाजातील प्रभावशाली लोकांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील मंदिर, मठ, जलस्रोत आणि स्मशानभूमी सर्व हिंदूंकरिता खुले आहेत, याची खात्री करावी. या विषयांवर कोणताही संघर्ष किंवा हिंसा होऊ नये.' ...
'धर्म' या संकल्पनेचा उलगडा करताना भागवत म्हणाले, "धर्माकडे अनेक वेळा 'मजहब' म्हणून बघितले जाते. मात्र, धर्म म्हणजे, एखादा 'मजहब' नाही. धर्म म्हणजे सृष्टी ज्या नियमांनुसार चालते, त्याचे विज्ञान आहे. ...
संघटनेच्या विकासाने काही लोकांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, ज्यातून विरोध होत असेल. परंतु संघ कुणालाही शत्रू मानत नाही असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. ...