मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने न्याय प्रक्रियेला गती द्यावी, मराठा आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या तरुणांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये मदत व एका सदस्याला नोकरी द्यावी, ‘सारथी’ संस्थेला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ...
पुढील दिशा ठरविण्यासाठी १९ ऑगस्टला पुण्यात राज्यातील मराठा संघटनांची गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...