मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
जालन्यातील आंदोलनस्थळी जाऊन छत्रपती संभाजीराजेंनी सकाळीच आंदोलकांची भेट घेतली आणि गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असे आव्हान दिले. ...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शनिवारी सकाळी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांना एक निवेदन दिले. ...
जालन्यातील घटनेचे पडसाद नाशिकमध्येदेखील उमटले आहेत. शहरातील सीबीएस परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते मेहेर सिग्नल या भागात सकल मराठा समाज तर्फे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. ...