जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी गेल्या काही काळात आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून विविध पिके घेत आहे आणि त्यात यशस्वी ठरत आहेत. पालघर जिल्ह्यातील सवरखंड येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफुलाची शेती केली आहे. ...
उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नसल्याने घरच्या शेतीत काहीतरी करू या उद्देशाने मेहनत आणि अनुभवाच्या जोरावर सुरु केलेल्या शेळीपालनाच्या जोड धंद्यातून चित्तेपिंपळगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील तरुण करतोय लाखोंची उलाढाल. ...
सध्या वाळवलेली मेथीची भाजी बाजारात विकली जात आहे. वाळवलेल्या मेथीचे १०० ग्रॅम वजनाचे पाकीट १५ ते २० रुपयांना विकले जात आहे. त्याला आकर्षक पॅकिंग केलेले आहे आणि त्यावर कसुरी मेथी असे नाव आकर्षकपणे छापून त्याची विक्री केली जात आहे. ...
गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी फार मोठी आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने मुग पिकाची लागवड करणे गरजेचे आहे. ...
राशिवडे येथील गावतलावात अॅझोला नावाचे शेवाळ नैसर्गिकरीत्या वाढू लागले आहे. हे अॅझोला शेवाळ दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिरवं सोनं मानलं जात. याचा वापर दुभत्या जनावरांसाठी केल्यास यातून या जनावरांसाठी लागणारी सर्व पोषणमूल्य व दुधाचे उत्पादन वाढणार आहे. ...
बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे. जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते. या पिकाचा व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे. ...
गुलाब फूल उत्पादनाचे माहेरघर, अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यात 'व्हॅलेंटाईन डे'ची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी गुलाब फुलांचे जादा उत्पादन, मात्र मागणीत घट झाल्याने देशातील व परदेशातील बाजारपेठांमध्ये फुलांचे भाव पडले आहेत. ...
बारामती तालुक्यात निरा डावा कालव्याच्या पाण्यावर बहुतांश शेतकरी ऊसशेतीला प्राधान्य देतात. मात्र, पिंपळी (ता. बारामती) गावातील दोघा उच्चशिक्षित भावंडांनी एकत्र येत ऊसाच्या पट्टयात विषमुक्त द्राक्ष बाग लागवडीचा प्रयोग केला आहे. ...