देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भाला देखील फायदा झाला आहे. विधानसभेचे विरोधीपनेतेपद विदर्भाला मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी तर विधानसभेच्या अध्यक्षपदी विदर्भातील नाना पटोले यांची निवड झाली आहे. ...
राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत आलेल्या काही युवकांनी कॉँग्रेस कमिटीबाहेरील फलकावर असलेल्या फलकाला काळे फासल्याने कॉँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एम.जी. रोडवर ठिय्या मारून रास्ता रोको आंदोलन केले. ...
नागरिकता सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करीत आहेत. या विधेयकाचा विरोध करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष माराहाणीचा काँग्रेस आंदोलनाद्वारे निषेध करीत आहे. ...