देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी झाली. त्यासोबतच काँग्रेसलाही विनाकारण वाईटपणा आला. आघाडी सरकारचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी चांगल्या समन्वयाची गरज आहे ...
आसाममधील तामूलपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली. बोडोलँड पीपल्स फ्रंटचे उमेदवार राम दास बसुमातारी गुरुवारी बंडखोरी करून भाजपमध्ये गेले आहेत. ...
Kerala assembly Election 2021 :अंतर्गत वाद, गटबाजीने आधीच पोखरलेल्या केरळ काँग्रेसमध्ये आता शीर्षस्थानी असलेल्या नेत्यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू केल्याने त्यांच्यात समन्वय राखण्याचे माेठे आव्हान हायकमांडसमोर उभे ठाकले आहे. ...
Congress Priyanka Gandhi Attacks Election Commission : निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आयोगाला सुनावलं आहे. ...
संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला. पटोलेंच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. ...