जशी भावना आपल्या अंतरंगात असेल, तसेच फळ आपणास मिळते. चंद्रकिरणांतून स्रवणाऱ्या अमृतमय आनंदाचा आस्वाद घेण्याऐवजी जर त्याच्यावरचा डाग शोधत बसलो, तर सर्वत्र डागाचेच साम्राज्य दिसेल. ...
निष्कलंक, धारदार, तेजस्वी मानसिकता हेच चारित्र्याचे गमक आहे. असे चारित्र्य संपादन करण्यासाठी सुबुद्धीचा कौल स्वीकारून, परिस्थितीचे आव्हान स्वीकारून, आपला जीवन आदर्श मनाशी निश्चित करून दृढतेने अखंडपणे चालत राहणे हाच चारित्र्यवर्धनाचा मार्ग आहे. ...