CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:31 AM2020-06-11T08:31:25+5:302020-06-11T08:48:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच काळजी वाढवणारा एक रिसर्च समोर आला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि हवामानातील बदल यांच्या कनेक्शनबाबत एक नवी माहिती रिसर्चमधून पुढे आली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जून महिन्यात दररोज 8 ते 10 हजार रुग्ण आढळून येत आहेत. तर कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

जवळपास दोन महिने लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांच्या पुढे गेली आहे.

कोरोना मृतांचा आकडा साडे सात हजारांहून अधिक आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयानं कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे. देशात आतापर्यंत 50 लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच काळजी वाढवणारा एक रिसर्च समोर आला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि हवामानातील बदल यांच्या कनेक्शनबाबत एक नवी माहिती रिसर्चमधून पुढे आली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने कोरोनाचा संसर्ग आणि हवामानातील बदल यांचा अभ्यास केला. यामध्ये आर्द्रता वाढल्यास कोरोना जास्त काळ वातावरणात राहू शकतो असं म्हटलं आहे.

आयआयटीने केलेल्या रिसर्चमध्ये पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याची शक्यता असल्याचं देखील नोंदवण्यात आलं आहे.

आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी कोरोना व्हायरसवर अभ्यास केला आहे. दोन्ही प्राध्यापकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या शिंकेतून निघणाऱ्या ड्रॉपलेटचा अभ्यास केला.

ड्रॉपलेटच्या कोरड्या होण्याच्या गतीची आणि जगातील 6 शहरांमध्ये दररोज होणाऱ्या संसर्गाची तुलना केली.

रजनीश भारद्वाज यांनी कोरड्या वातावरणापेक्षा आर्द्रता क्षेत्रात विषाणूचा अस्तित्व दर 5 पट जास्त असल्याची माहिती दिली आहे.

मुंबईत लवकरच मान्सून धडकणार आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका अधिक आहे.

पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त वेगाने वाढू शकतो.

प्राध्यापक अमित अग्रवाल यांनी जर आर्द्रतेमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त काळ टिकून राहिला तर मुंबई, केरळ आणि गोवा यासारख्या राज्यांत येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होईल.

आयआयटीच्या प्राध्यापकांनी केलेल्या या अभ्यासाशी अनेक डॉक्‍टर्स सहमत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.

भारताने कोरोना चाचण्यांमधील 50 लाखांचा टप्पा पार केला. भारताआधी तीन देशांनी 50 लाख चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटनचा समावेश आहे.

अमेरिकेने 2.18 कोटी, रशियानं 1.13 कोटी, तर ब्रिटननं 59 लाख चाचण्या घेतल्या आहेत. चाचण्यांचा आकडा पाहिल्यास भारत ब्रिटनच्या जवळ आहे. मात्र अमेरिका, रशियाच्या खूप मागे आहे.