शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

…तर भारताच्या ‘चक्रव्युहातून’ बाहेर पडणं कठीण; सीमेवरील डावपेच चीनला महागात पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:33 PM

लडाख ते अरुणाचल पर्यंतच्या ३ हजार ४८८ किलोमीटर लांबीच्या लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) वादग्रस्त भागात रस्ते आणि हवाई संपर्क करण्याच्या दृष्टीने चीनच्या वर्चस्वाला भारत आव्हान देत आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरससाठी चीनला जबाबदार धरण्याची अन्य देशांची मागणी चीनमधील अनेक कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत तैवान, अमेरिकेची भारताला मदत मिळण्याची शक्यता अधिक

नवी दिल्ली – कोरोनाबाबत माहिती लपवल्याच्या आरोपाखाली अडकलेल्या चीननेभारताविरुद्ध दबाव आणण्याचे डावपेच रचत आहे. परंतु डब्ल्यूएचओपासून इतर अनेक मार्गातून भारतानेचीनसाठी असे चक्रव्यूह तयार केले आहे ज्यावर मात करणे चीनसाठी कठीण आहे. लडाख सीमेवर भारताने पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात मजबूत केल्याने चीनला दणका बसला आहे.

लडाख ते अरुणाचल पर्यंतच्या ३ हजार ४८८ किलोमीटर लांबीच्या लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) वादग्रस्त भागात रस्ते आणि हवाई संपर्क करण्याच्या दृष्टीने चीनच्या वर्चस्वाला भारत आव्हान देत आहे. एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) च्या कार्यकारी मंडळाची धुरा भारताच्या हातात आली आहे. कोरोना विषाणूचा उद्भव चीनच्या वुहानमध्ये झाला. असे अनेक अहवाल आहेत की, चीनने सुरुवातीला व्हायरसची प्रकरणे लपविली. हळूहळू कोरोना सर्वत्र पसरला आणि आज याच परिस्थितीने ३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

जगातील अनेक देशांनी कोरोना व्हायरससाठी चीनला उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली. आता चीन जगातील अन्य देशांच्या जाळ्यात अडकत आहे. त्याचबरोबर चीनचा बचाव करणाऱ्या डब्ल्यूएचओच्या भूमिकेबाबतही निर्णय घेण्यात येईल. भारतासह जगातील ६२ देशांनी कोरोनावरील स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. चीनविरुद्ध डब्ल्यूएचओची चौकशी सुरू झाल्यास अनेक लपवलेली तथ्ये समोर येतील.

तैवानचे राष्ट्रपती साइ इंग वेन यांच्या शपथविधी सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजपाच्या दोन खासदारांच्या सहभागाने चीनला मिरची झोंबली. चीनने भारताला त्यांच्या 'अंतर्गत' कामात हस्तक्षेप करण्याचे टाळण्यास सांगितले आहे. तैवानच्या राष्ट्रपतींनी बुधवारी शपथ घेतली. दिल्लीतील भाजपा खासदार मीनाक्षी लेखी आणि राजस्थानमधील चुरूचे खासदार राहुल कासवान यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यात भाग घेतला होता. या कार्यक्रमात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ हेदेखील उपस्थित होते. तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थक साइ इंग-वेन यांनी नुकतीच दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. तैवानलाही अमेरिकेचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत भारत येथेही चीनविरूद्ध चक्रव्यूह करू शकतो.

दक्षिण चीन समुद्रात तेल उत्खननाबाबत चीन आणि मलेशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह चीनची युद्धनौका पोहचली आहे. दक्षिण चीन समुद्रातून जाणाऱ्या प्रवासात सागरी कनेक्टिव्हिटी इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या शांतता, स्थिरता, समृद्धी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे असा भारताचा विश्वास आहे. सध्याच्या परिस्थितीत जरी भारत आपला दृष्टीकोन बदलत नसेल, परंतु चीन जर आणखी हिंमत करेल तर भारताची वृत्तीही बदलू शकते.

जगातील सर्वात पसंतीचं उत्पादन केंद्र म्हणून चीनची ओळख मिटण्याच्या मार्गावर आहे. कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या अडचणींमध्ये सुमारे १ हजार विदेशी कंपन्या भारतात कारखाने सुरू करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. यापैकी किमान ३०० कंपन्या मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे, वस्त्रोद्योग आणि कृत्रिम वस्त्र क्षेत्रात भारतात कारखाने सुरू करण्यासाठी सरकारशी सक्रिय संपर्क साधत आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

चीनविरुद्ध भारताचं ‘पंच’तंत्र सज्ज; लडाख सीमेवर ड्रगनला चोख उत्तर देण्यास लष्कराची तयारी

बोटांच्या लांबीने कळेल तुम्हाला कोरोनामुळे मृत्यूचा धोका किती?; वैज्ञानिकांनी सांगितलं...

कोरोनाशी लढण्यासाठी वैज्ञानिकांचा नवा शोध; ‘या’ औषधाचा एक डोस रुग्णांना देणार ताकद!

रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार; ३० तासांच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस, मजूर हैराण

हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; दुपारी १ ते ५ दरम्यान घराबाहेर पडणं टाळा अन्यथा...

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका