शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:43 IST

राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतले नाही तरीही तुम्ही मांडव घातला. राजभवन तुम्ही चालवताय का? असं सांगत संजय राऊतांनी शपथविधी सोहळ्यावरून भाजपाला सवाल केले. 

मुंबई - सरकारमध्ये दुसऱ्या नंबरचं खातं गृहखाते आहे. मुख्यमंत्री गृहखाते आपल्याकडे ठेवतो. देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याकडे ठेवलेले आहे. जेव्हा जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी पूर्वी करायचो, तेव्हा ते सांगायचे. उद्धव ठाकरे यांनी गृहखाते दुसऱ्या पक्षाला देण्याची चूक करू नये, आमचेही तेच म्हणणं होतं. कारण गृहखाते, विधानसभेचे अध्यक्षपद हे त्या काळात संवेदनशील विषय होते त्यामुळे आमचं सरकार पडलं नाहीतर पडले नसते असं मोठं विधान संजय राऊत यांनी केले आहे. फडणवीसांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण करत राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे रोख धरल्याची चर्चा आहे. कारण मविआ काळात विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे तर गृहखाते राष्ट्रवादीकडे होते. 

संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सरकार स्थापनेला होणाऱ्या विलंबावर टीका केली. राऊत म्हणाले की, पोलीस यंत्रणा वापरून सत्ताधाऱ्यांनी अनेकांवर दहशत निर्माण केली, अटक केली, निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही यंत्रणा आपल्या हातात पाहिजे. भविष्यात याच यंत्रणेचा वापर करून एकनाथ शिंदे भाजपाच्या अंगावरही जाऊ शकतात. ही त्यांची वृत्ती आणि विकृत्ती आहे. एका गृहमंत्रिपदावरून हे थांबलेले नाही, त्यामागे वेगळी कारणे असतील असा दावा त्यांनी केला. 

तसेच भाजपा जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष, नरेंद्र मोदी-अमित शाहांसारखे मजबूत नेते, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस वैगेरे....एका गृहमंत्रिपदावरून या महाराष्ट्राचं सरकार अधांतरी लटकून पडले आहे मग हे कसले मजबूत लोक? तुमच्यासमोर कोण आहे? तुमच्याकडे स्वत:चा बहुमताचा आकडा आहे. तुमच्याकडे ४० लोक घेऊन अजित पवार आहेत. शिंदे गटाचे लोक भविष्यात काय करतील माहिती नाही पण बहुमत असतानाही तुम्ही सरकार बनवत नाही. सत्ता हाती घेत नाही. राजभवनात सत्तास्थापनेचा दावा अद्याप करत नाही. तुमचे समर्थक आमदार त्यांची नावे द्यायला तयार नाहीत. राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतले नाही तरीही तुम्ही मांडव घातला. राजभवन तुम्ही चालवताय का? असं सांगत संजय राऊतांनी शपथविधी सोहळ्यावरून भाजपाला सवाल केले. 

दरम्यान, भाजपानं मनात आणलं तर आता जे मागण्या करतायेत ना त्यांना एका मिनिटात चिरडून टाकतील. हे लोक डरपोक आहेत. ईडी, सीबीआयला घाबरून पळून गेलेत. जे निवडून आलेत ते एका स्वबळावर निवडून आले नाहीत. या लोकांना जनमताचा पाठिंबा नाही. फक्त एक गृहमंत्रिपद वादाचा विषय सरकार स्थापनेचा असू शकत नाही. अनेक राज्यात भाजपाने सरकार बनवली आहेत, प्रस्थापित मुख्यमंत्र्‍यांना डावलून नवीन लोक आणली आहेत त्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न आहे. फडणवीसांच्या जागी वेगळं कुणी आणलं जातंय का, त्यामुळे हे थांबलंय का..? या सर्व गोष्टींचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला हवा अन्यथा आम्ही आमचे पुस्तक बंद आहे ते उघडू असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे