जिल्हाधिकारी कार्यालयात ई-पास देण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पास देण्यात दुजाभाव केला जात असून तेथील अधिकारी आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कारण नसताना सुद्धा काही तासांत परवानगी देत आहेत. तर एका रूग्णाने २३ जून रोजी अर्ज केला असता त्याला २५ जून रोजी ...
सात जूनला मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली होती. अधून-मधून हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. परंतु तलाव, बोड्यांमध्ये आतापर्यंत पाणीसाठा झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी शेताची नांगरणी करुन रोवणीसाठी दमदार ...
पैसे काढणे जलदगतीने व्हावे यासाठी एटीएमची संकल्पना पुढे आली. शहरासह गावखेड्यातही एटीएम लावण्यात आले. बँकातील गर्दी कमी होऊन नागरिकांना तात्काळ पैसे मिळू लागले. एटीएमची संपूर्ण जबाबदारी बँकांची असा सर्वसाधारण समज आहे. मात्र बँकांनी ही सर्व जबाबदारी नि ...
तुमसर शहराच्या पूर्वेला शिवाजी नगरात मध्यवर्तीस्थानी १८ सदनिका आहेत. येथील बांधकाम दर्जेदार असून प्रशस्त अशा सदनिका आहेत. मागील दहा वर्षापूर्वी सदनिकांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर सुरुवातीच्या काळात काही वर्षे येथे कर्मचारी व अधिकारी वास्तव् ...
प्रथम कोविड रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले. संस्थात्मक क्वारंटाईन कक्षासह आयसोलेशन वॉर्डाची निर्मिती करण्यात आली. भंडारासह सहाही तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय पथकांसह आशा कर्मचाऱ्यांची मदत घे ...
गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. नर्सरीतील पऱ्हे पिवळे पडून वाळायला लागले होते. तर रोवणी झालेल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत होते. शेकडो हेक्टरवरील रोवणी उलटणार की काय, अशी शंका निर ...
मुख्य रस्त्यावरून वाहने कशी न्यावी, रहदारी कशी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. आंतरराज्यीय रस्त्याला मंजुरी मिळाल्यावर तुमसर शहराअंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले. मात्र नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी रस्त्याशेजारी मोकळ्या जागेत भ ...
ग्रामीण भागात गावोगावी कडुनिंबाची भरपूर झाडे आहेत. या झाडांना भरपूर निंबोळी असून त्या सध्या पक्व होत आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क तयार करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे केले जात आहे. २५ किलो निंबोळ्या जमा केल्यास त्याच्या पाच टक्के निंबोळी अ ...
वरिष्ठ अधिकारी तसेच परिसरातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच रेतीचे उत्खनन होत आहे. जिल्ह्यातील रेतीला चांगली मागणी असल्याने जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात रेती विक्रीसाठी पाठविली जात आहे. सर्रासपणे वाहतूक सुरु असताना परिसरातील पोलीस मात्र या ...