भगवंतच या संपूर्ण दृश्य विश्वाचा निर्माता, त्राता आणि संहारकर्ता आहे, हे ज्ञानमार्गानेच कळते. चराचरात एक भगवंतच व्यापून आहे हे सत्य जेव्हा साधकाला जाणवते तेव्हाच त्याला ‘वासुदेव: सर्वामिति’ या भगवंत वचनाचा अनुभव येईल. ...
शरीर अशक्त असलेल्यांनी नाडी अवरोध, भस्त्रिका, एकाग्ड.-स्तंभ, सर्वांगस्तंभ, मुख-प्रसारक पूरक, हृदय-स्तंभ, अग्नी-प्रदीप्ति तसेच वायवीय कुंभक ही आसने करू नयेत. ...
आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल साधारणपणे रात्री ३.३0 ते पहाटे ५.३0 किंवा ६.00, किंवा सूर्योदयाच्या वेळेपर्यंत. ...
आपल्या मनरूपी डोहात ज्या ब्रह्मानंदाच्या लाटा उचंबळून येतात. त्यांचेच जलतीर्थ समाज जीवनास वाटत राहावे हा संतवाणीचा प्रमुख उद्देश आहे. संतांची वाणी ही कैवल्याची खाणी, सौंदर्याची लेणी, चैतन्याची गाणी, मोक्षसुखाची आनंदवाणी आहे. ...
सच्चा वारकरी विठोबा रखमाईचं किंवा ग्यानबा तुकारामचं नाम घेत पंढरीच्या वाटेवर ‘आनंदात’ चाललेला असतो. तो आनंदात असतो कारण त्याला कुठंही पोचायचं नसतं. ...