तालुक्यातील धोंडगाव येथील शेतकरी गजानन थुटे यांचे घर सततच्या पावसादरम्यान कोसळले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. असे असले तरी माहिती देऊनही पंचनामा करण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने त्यांच्या अडचणीत भर ...
दारूबंदीच्या वर्धा जिल्ह्यात मद्य बाळगण्याकरिता मागील सहा महिन्यांत तब्बल ९५५ जणांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून माजी सैनिकांसह, सर्वसामान्य व्यक्तींनी मद्यपरवाने मिळविले. जिल्ह्यात १९७५ ला शासनाने दारूबंदी केली. ...
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वर्धा येथील स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालयाची मागणी पूर्ण केली असून ते कार्यालय तत्काळ कार्यान्वित करावे, यासह महत्त्वाच्या अकरा मागण्यांचे निवेदन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या देत वीज बिलांची होळी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. ...
आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात एकत्र झालेल्या महिलांचे निवेदनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले नसल्याचा आरोप करीत सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमो ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीतून सकारात्मक ऊर्जा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी नागपूरच्या दिशेने रवाना झाली. या महाजनादेश यात्रेचे सेलू, केळझर आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. ...
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. ...
देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अडविण्यात आल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाने शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, याबाबत देवळी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात वर्ध्यात सिमेंटीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणात विकास साधला गेला आहे. शहरातील डांबरी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. काही कामे प्रगतिपथावर आहे; मात्र नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे ...