Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: राज्यातील आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असल्याची चर्चा असली तरी बंडखोर यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: एकीकडे शिंदे गट राष्ट्रवादीवर टीका करत असताना, दुसरीकडे शरद पवारांनी पुढील निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याबाबत सूतोवाच केले आहे. ...