देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
स्वत: राहुल गांधी यांनाही अमेठी या पारंपारिक मतदारसंघात पराभव सहन करावा लागला. अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या स्मृती इराणी निवडून आल्या तर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींना विजय मिळाला. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक देश एक निवडणूक हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलून धरला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे जात बैठक बोलविली आहे. ...
शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झालेली आहे. दिवसा काँग्रेसचे मिरविणारे नेते रात्र होताच भाजपचे होतात. असे किती दिवस चालणार, असा सवाल करीत काँग्रेसचे नेते विश्वासराव देशमुख यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण ...
आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढण्याचे ठरल्यास तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात सक्षम उमेदवार देऊन ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. ...
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. लोकसभेचे निकाल लागून महिना उलटत आला तरी या धक्क्यातून पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ते सावरलेले नाहीत. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद नाकारले होते. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या संदर्भात राहुल यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी देखील चर्चा केली होती. ...