वित्त विभागाने पणन विभागास ४६५ कोटी ९९ लाख रुपये इतका निधी वितरीत केला आहे. लवकरच कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ...
दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन उसनवारी किवा खासगी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षाही दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ...
बुधवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या काही कोथिंबीर मालाला एक रुपया प्रति जुडी असा बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना कोथिंबीर बाजार समितीत सोडून माघारी फिरावे लागले. ...
टोमॅटोला राज्यातील बाजारसमित्यांमध्ये आज नेहमीप्रमाणेच दर मिळाले. नेपाळहून भारत सरकारने टोमॅटो आवकेचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतातील एकूण गरजेच्या ही आवक एक टक्काही नसल्याने त्याचा टोमॅटोच्या दरावर फारसे परिणाम जाणवले नाहीत. ...
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून वेळेवर न आल्यामुळे खरीप पेरण्या झाल्या नाहीत खरिपातील कडधान्य पेरण्याची मुदत संपल्यामुळे भविष्यातही तूर, मूग, मटकी, उडिदाचे दर तेजीत राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. ...