शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:47 IST

चार राज्यांपैकी तीन राज्यांचे निकाल विरोधकांसाठी धक्का देणारे आहेत. केरळमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली असली, तर आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचा मोठा पराभव झाला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भाजपा, तामिळनाडूमध्ये टीव्हीके, केरळात काँग्रेस आघाडी, आसाममध्ये भाजपा आणि पद्दुचेरीमध्ये भाजपा आघाडी! देशातील चार राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएचा आत्मविश्वास या निकालाने वाढवला आहे, तर इंडिया आघाडीचे काय होणार, या चर्चेला तोंड फुटले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भगवामय करण्याचे भाजपाचे स्वप्न पूर्ण झाले. ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजपाने पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमत मिळवले. आसाममध्येही सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात भाजपाला यश आले. तामिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीके इंडिया आघाडीलाच झटका दिला. तर केरळात काँग्रेसने डाव्यांचा पराभव केला. पण, या चार राज्यांच्या निकालाने इंडिया आघाडीचीच पिछेहाट झाली आहे. 

दोन वर्षातच इंडिया आघाडीला तडे?

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी यूपीए विसर्जित करून इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी सत्तेपर्यंत मजल मारता आली नाही, पण चांगले यश मिळाले. मात्र, त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीलाच तडे जाताना दिसले. आता तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या निकालांनी त्यात भर घातली आहे. 

इंडिया आघाडीची बोट डळमळीत

राजकीय विश्लेषकांच्या मते लोकसभा निवडणुकीत एकसंध असणारी इंडिया आघाडी विधानसभा निवडणुकांवेळीच जास्त कमकुवत होत गेली. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही ममतांनी काँग्रेसला सोबत घेणे टाळले. तर तामिळनाडूतही काँग्रेसचा फार फायदा द्रमुकला झाला नसल्याचे दिसत आहे. 

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील पराभवामुळे भाजपाशी थेट भिडणाऱ्या दोन नेत्यांनाच झटका बसला आहे. ममता बॅनर्जी आणि एमके स्टॅलिन या निकालानंतर काय भूमिका घेतात आणि ते इंडिया आघाडीसोबत राहण्याबद्दलही शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. 

या निवडणुकीमुळे उत्तर प्रदेशातही समाजवादी पक्ष काँग्रेसला सोबत घेणार का? असा प्रश्न आता चर्चेला आला आहे. कारण उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसची पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. प्रादेशिक पक्ष आणि भाजपाच्या थेट संघर्षात काँग्रेसला गेल्या काही निवडणुकांमध्ये फार चांगलं यश मिळू शकलेलं नाही. त्यामुळे २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये इंडियाला आणखी तडे जाऊ शकतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal, Tamil Nadu results question India alliance's future, alter politics.

Web Summary : Assembly election results in West Bengal, Tamil Nadu, Kerala, Assam, and Puducherry boost NDA. India alliance faces challenges as regional parties gain prominence. Future of India alliance is uncertain.
टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Tamilnaduतामिळनाडूcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका