शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:45 IST

Mamata Banerjee West Bengal Election: २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस भाजपावर भारी पडली होती. पण, अवघ्या दोन वर्षानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ममतांना सत्तेवरून हटवले. 

पश्चिम बंगालमध्येभाजपाने कल्पनेपलिकडचे यश मिळवले. १४७ बहुमताचा आकडा असलेल्या पश्चिम बंगालमध्येभाजपाने दोनशेपर्यंत मजल मारली आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला ८८ जागांवरच आघाडी मिळाली आहे. बंगालमधील हे राजकारण दोन वर्षात पूर्णपणे बदलेलं दिसलं. बरोबर दोन वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत ममतांच्या तृणमूल काँग्रेसने बंगालमध्ये भाजपाला मर्यादित जागांवर रोखत २९ जणांना निवडून आणले. पण, आता ममतांच्या हातातील सत्ताच भाजपाने हिसकावून घेतली. भाजपाने हे राजकीय गणित दोन वर्षात कसं बदललं?

२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तृणमूल काँग्रेसने भाजपाचे आव्हान रोखत २९ जागा जिंकल्या, तर भाजपाला केवळ १२ जागांवरच विजय मिळवता आला. त्यांना ६ जागा गमवाव्या लागल्या. हे तृणमूलचे मोठे यश होते कारण त्यापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २२ जागा जिंकता आल्या होत्या. पण, या निकालानंतर भाजपाने पश्चिम बंगालवर लक्ष्य केंद्रित केले आणि सत्तेचं सिंहासन गाठले. 

भ्रष्टाचार आणि घोटाळे

मागील १५ वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या पराभवाला ज्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, त्यात गंभीर स्वरुपाचा भ्रष्टाचार, घोटाळे आणि आरजीकर रुग्णालयातील अत्याचार प्रकरण. मागील दोन वर्षात तृणमूलच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आणि तेच मुद्दे भाजपाने लोकांवर बिंबवले. त्यामुळे तृणमूलची प्रतिमा डागाळली गेली. 

शिक्षक भरती, रेशनमधील गैरव्यवहाराने पक्षाचे नुकसान

तृणमूलचे सरकार असताना शिक्षक भरती झाली. त्यात अनियमितता झाल्याचे प्रकरण गाजले. इतकंच नाही, तर रेशनमध्येही गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाने ममता सरकारची प्रतिमा वाईट केली. हेच मुद्दे भाजपाकडून उचलले गेले. त्यात भाजपाने आणखी एका मुद्द्याची भर घातली ती म्हणजे महिला सुरक्षा. याच मुद्द्यावरून भाजपाने वारंवार ममता बॅनर्जींच्या सरकारला घेरण्याचे प्रयत्न केले. 

पीडितेच्या आईलाच उमेदवारी

कोलकात्यातील आरजी कर महाविद्यालयात अत्याचार आणि हत्या झालेल्या पीडित डॉक्टर तरुणीच्या आईलाच उमेदवारी दिली. त्याचा थेट फायदा निवडणुकीत भाजपाला झाला. यात आणखी एक घटक महत्त्वाचा ठरला तो म्हणजे सरकारविरोधात असलेली नाराजी. त्या नाराजीच्या विस्तवाला भाजपाने आणखी हवा दिली. 

घुसखोरांचा मुद्दा

भाजपाने या निवडणुकीत बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्याचा ममता सरकारविरोधात वापर केला. ममता बॅनर्जी यांचे सरकार सीमेवर सुरक्षा जाळे उभारण्यास अडथळे आणत असल्याचा आरोप भाजपाकडून केला गेला. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये घुसखोर मतदान करत असल्याचा मुद्दाही अधोरेखित केला गेला. 

हिंदुत्वाचा मुद्दा

भाजपाकडून पश्चिम बंगालमध्ये गेल्या दोन वर्षात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही जोर दिला गेला. हिंदू महिलांची सुरक्षा, तृणमूल काँग्रेसचे धोरण यावरही लक्ष्य केले गेले.  ममतांचे सरकार हे हिंदू विरोधी असल्याचा प्रचार भाजपाकडून केला गेला. त्यासाठी वेगवेगळ्या हिंदू सण उत्सवावेळी झालेल्या संघर्षाच्या घटनांचे दाखले दिले गेले. 

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal: Why did Mamata Banerjee lose power in two years?

Web Summary : Corruption, electoral malpractices, and the R.G. Kar hospital incident damaged Mamata Banerjee's image. BJP highlighted these issues, exploiting public dissatisfaction and concerns about women's safety and illegal immigration. Focus on Hindutva also played a role.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाPoliticsराजकारण