शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

coronavirus: कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? राहुल गांधींच्या प्रश्नाला हॉवर्डच्या प्राध्यापकांनी दिलं असं उत्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:24 PM

आज राहुल गांधींनी जागतिक स्तरावरील दोन तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधींनी हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आशिष झा यांच्याशी संवाद साधताना कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? असा प्रश्न विचारला.

ठळक मुद्दे तीन देशांमध्ये संशोधनाला मिळत असलेल्या यशामुळे अपेक्षा आहे की, अशी लस लवकरच उपलब्ध होईल.पुढील वर्षापर्यंत कोरोनावरील लस येऊ शकेल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. भारताला यासाठी एक मोठी योजना आखावी लागेल. कारण भारताला ५० कोटी पेक्षा अधिक लसींची निर्मिती करावी लागेल.   

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी सक्रिय झाले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि कोरोनानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाबाबत ते सातत्याने तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. आज राहुल गांधींनी जागतिक स्तरावरील दोन तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधींनी हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आशिष झा यांच्याशी संवाद साधताना कोरोनावरची लस कधीपर्यंत येणार? असा प्रश्न विचारला. त्यानंतर प्राध्यापक झा यांनीही त्याला तितक्याच सफाईदार पद्धतीने उत्तर दिले.

आज झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी विचारले की, भावा, कोरोनावरची लस कधीपर्यंत मिळेल असं वाटतं? त्यावर उत्तर देताना प्राध्यापक झा म्हणाले की, तीन देशांमध्ये संशोधनाला मिळत असलेल्या यशामुळे अपेक्षा आहे की, अशी लस लवकरच उपलब्ध होईल. मात्र पुढील वर्षापर्यंत कोरोनावरील लस येऊ शकेल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. भारताला यासाठी एक मोठी योजना आखावी लागेल. कारण भारताला ५० कोटी पेक्षा अधिक लसींची निर्मिती करावी लागेल.   

सद्यस्थितीत अमेरिका, युनायटेड किंग्डम इस्राइल यासारख्या देशांमध्ये कोरोनावरील लसीबाबत संशोधन सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात याबाबतची चाचणीही सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत या वर्षाच्या अखेरीपर्यंत कोरोनावरील लस येईल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही, असे प्राध्यापक झा यांनी सांगितले.

मात्र कोरोनाची लस व्यापक प्रमाणावर उपलब्ध होण्यास वर्षभर वाट पाहावी लागेल. कारण यशस्वी चाचणी आणि इतर प्रक्रिया पार पाडल्यानंतर तातडीने अशा प्रकारच्या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे खूप कठीण असेल.  

दुसरीकडे भारतातही कोरोनावरील लस शोधण्यासाठी संशोधकांची अनेक पथके कार्यरत आहेत. त्याला भारत सरकारकडूनही सातत्याने मदत मिळत आहे. त्यामुळे जर भारतात कोरोनाची लस तयास झाली, तरी ते आश्चर्यकारक नसेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या   

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

दरम्यान, कोरोनानंतरचे जग पूर्णपणे बदललेले असेल. ही साथ लोकांना एकत्र येण्यास मदत करेल. कारण आज प्रत्येक जण जात-धर्म विसरून कोरोना विषाणूविरोधात लढाई लढत आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने  एक धोरण ठरवून काम केले पाहिजे. कारण कोरोनाविरोधातील खरी लढाई जमिनीवर लढली जात आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndiaभारत