ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालयासाठी पासेस दिल्या जातात. मात्र बसेस कधीच वेळेत येत नाही. ...
मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. ...
अतिरिक्त शिक्षकांना कार्यमुक्त करणे किंवा त्यांना रुजू करून घेणे, ही बाब गेल्या तीन वर्षांपासून मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही झंझट टाळण्यासाठी यंदा मुख्याध्यापकांनी थेट शासनाच्या पोर्टलवरच चुकीची माहिती भरण्याचा प्रकार केला आहे. ...
ढगाळ वातावरणाने कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला वाढला आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून २८ हजार गावांमध्ये फरदड मुक्ती अभियान राबविले जाणार आहे. ...
१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ...
येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला. ...
ढगाळी वातावरण आणि सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शहरवासीयांना प्रचंड गारठ्याचा अनुभव येत आहे. त्याचवेळी शेतशिवारात मात्र हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे. ...