डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे. ...
आईच्या (अवनी) हत्येनंतर अनाथ झालेल्या दोन बछड्यांची चिंता आता मिटली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे दोनही बछडे आता शिकार करायला लागल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे. ...
येथील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी उईकेंच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उईके निवडून यावे म्हणून कार्यकर्त्यांसह प्रचंड परिश्रम घेतले. अखेर उईके निवडून आले आणि पुरकेंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा सुरू झाल्या आहेत. येथील दाखल रुग्णांची संख्या आणि प्रत्यक्ष उपलब्ध असलेले डॉक्टर यात प्रचंड तफावत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ...
वणी तहसील कार्यालयाच्या रॅपेड अॅक्शन टिमने तालुक्यातील अनेक रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता परजिल्ह्यातील वाळू तस्करांनी डोकेवर काढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वणी शहरात अवैधरित्या रेती आणली जात असल्याची बाब महसूल विभागाने ...
पाच राज्यांच्या निकालात भाजपाची वाताहत होऊन काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. या निकालाचा जल्लोष यवतमाळ शहरातील दत्त चौकासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके फोडून व मिठाई वाटून साजरा करण्यात आला. ...
पाच राज्यात भाजपाची वाताहत होण्यामागे शेतकरी, व्यापारी व समाजातील अन्य घटकांची भाजपावर असलेली नाराजी हे प्रमुख कारण असल्याची प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. ...