Next

...तर ठामपा मुख्यालयाच्या दारातच आंब्यांची विक्री करू; आनंद परांजपेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:18 PM2019-05-10T17:18:28+5:302019-05-10T17:20:21+5:30

भाजपाच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील तसेच शहरातील  समस्या सोडवण्यासाठी राजकारण करावे. गोरगरीब शेतकरी आपली उत्पादने विकण्यासाठी ठाण्यात येत असतील ...

भाजपाच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील तसेच शहरातील  समस्या सोडवण्यासाठी राजकारण करावे. गोरगरीब शेतकरी आपली उत्पादने विकण्यासाठी ठाण्यात येत असतील तर त्यांना हुसकावून लावण्याचे राजकारण करू नये; अशी टीका  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. विरोध केल्यास ठाणे पालिका मुख्यालयाच्या दारातच आंब्यांची विक्री करु असा इशारा त्यांनी दिला.