राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Jayant Patil : विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. ...
Amit Shah News: ड्रग्ज रॅकेटप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'टास्क फोर्स' निर्माण करून संपूर्ण देशभरातील ड्रग्ज माफियांचे हे रॅकेट उद्ध्वस्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. ...
Amol Mitkari : महायुतीमधील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता पुन्हा प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. ...
Akola News: सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. ...
बारामतीला 1हजार कोटीचा निधी दिला होता. मात्र, बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना? जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते; हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार. जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला. ...